संबंधित माहिती
- आपसातील वादामुळे दोघांचेही नुकसान-मोहन भागवत
- महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होणार - संजय राऊत
- अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?
- 'देशाचा विकास दर आणखी घसरण्याची शक्यता; नोकऱ्याही जाणार'
- 'शिवसेनेबरोबर जाऊ नका,' सोनिया गांधी यांना मुस्लिम संघटनांनी खरंच असं पत्र लिहिलं?
सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही- केंद्र सरकार
विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. लिखित उत्तरात केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली. योग्यवेळी सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली.
समाजातील विविध धुरिणांना गौरवण्यात यावं अशा शिफारसी केल्या जातात. मात्र या पुरस्कारासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने सावरकरांना भारतरत्न पुरस्काने सन्मानित करू असं म्हटलं होतं.