गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:39 IST)

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात येत आहे. या निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
 
वरील सर्व राज्यांच्या विधानसभेची मुदत लवकरच संपणार आहेत. या राज्यातील राजकीय वातावरणही सध्या तापलं असून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
 
मतदारांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाईल आणि कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल, असं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
 
पहिल्या टप्प्यातील मतदान (30 जागा) - 27 मार्च 2021
दुसऱ्या टप्प्यातील मतदान (30 जागा) - 1 एप्रिल 2021
तिसऱ्या टप्प्यातील मतदान (31 जागा) - 6 एप्रिल 2021
चौथ्या टप्प्यातील मतदान (44 जागा) - 10 एप्रिल 2021
पाचव्या टप्प्यातील मतदान (45 जागा) - 17 एप्रिल 2021
तामिळनाडू विधानसभा निवडणूक (234 जागा)
मतदान - 6 एप्रिल 2021
निकाल - 2 मे 2021
केरळ विधानसभा (140 जागा)
मतदान - 6 एप्रिल 2021
निकाल - 2 मे 2021
आसाम विधानसभा निवडणूक
पहिला टप्प्यातील मतदान - 27 मार्च 2021
दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल 2021
तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल 2021
निकाल - 2 मे 2021
पुदुचेरी विधानसभा निवडणूक (30 जागा)
मतदान - 6 एप्रिल 2021
निकाल - 2 मे 2021
निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
 
निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमध्ये 18 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील
पाचही राज्यांमध्ये एकूण 824 जागांवर मतदान होईल
केरळ आणि पुदुचेरीत मतदान केंद्र वाढवण्यात आलेत
डोअर टू डोअर कॅम्पेन 5 पेक्षा जास्त लोक करू शकत नाहीत
उमेदवार ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज दाखल करू शकतात
मतदानाचा वेळ एका तासाने वाढवण्यात आला आहे
संवेदनशील मतदान केंद्रांची यादी करण्यात आली असून, तिथं CRPF तैनात करण्यात येतील
परीक्षा, सण असतील, त्या दिवशी मतदान नसेल
तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहित लागू होतील
कोरोना काळात बिहारनंतर होणारी ही दुसरी निवडणूक आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या पाहता निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी काय सूचना करतो, याकडे सर्वांच लक्ष असेल.
निवडणूक होत असलेले पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्य म्हणून ओळखले जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे.
 
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच येथील सरकार कोसळलं आहे.
 
वरील सर्व राज्यांमध्ये सर्वात लक्षवेधी लढत ही पश्चिम बंगालमध्ये असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात.
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. याठिकाणी भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. त्यातही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील बरीच नेतेमंडळी आता भाजपवासी झाली आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
 
त्याचप्रमाण, तामिळनाडूची यंदाची निवडणूक सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष द्रमुक या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
 
अण्णाद्रमुकच्या जयललिता आणि द्रमुकचे करूणानिधी या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांचं गेल्या तीन वर्षांत निधन झालं. त्यांच्याा अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची असेल.