कृती : कांदा व आल्याचे पेस्ट करा व लवंगा आणि वेल्याची पूड तयार करा. बटाटे शिजवून घ्या. बटाटे सोलून 1 /2 चमचा हळद टाकून चांगले मिसळा. बटाटेचे 3 भाग करा. कढईत तेल गरम करून तमालपत्र आणि जिरे घाला. काही सेकंद ढवळा. चिरलेला कांदा घालून बदामी होईपर्यंत परता. त्यात पेस्ट घालून 2 मिनिटे परता. नंतर टोमॅटो, मिरची पूड, जिरे, धने पूड, मीठ साखर आणि उरलेली हळद घाला. मधून मधून ढवळत तेल सुटेपर्यंत शिजवा. बटाटे घाला. लवंग, दालचिनीची पूड आणि उरलेले पाणी घालून 5 मिनिट शिजवा. सर्व्ह करताना तूप सोडा व गरम गरम वाढा.