Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा 3600 एपिसोडनंतरही वाद सुरूच का आहे?

Updated: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (22:08 IST)
शोमध्ये बावरीच्या व्यक्तिरेखेचा पुन्हा प्रवेश करण्यात आला आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्री नवीना वाडेकरची निवड करण्यात आली आहे.
 
नवीना वाडेकरबद्दल शोचे निर्माते असित कुमार मोदी सांगतात, "मला बावरीच्या व्यक्तिरेखेसाठी एक नवीन आणि निरागस चेहरा हवा होता आणि आम्ही जे शोधत होतो ते आम्हाला सुदैवानं सापडलं आहे. बावरी शोमध्ये दाखल होताच सेटवरील बावरी आणि बाघाचे फोटोही व्हायरल व्हायला लागले आहेत आणि शूटिंगही जोरात सुरू झाले आहे.
 
शैलेश लोढा यांनी केले आरोप
एकीकडे शोमधील पात्रांचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे शोशी संबंधित आणखी एक वाद निर्माण झाला आहे. हा नवा वाद शैलेश लोढा यांच्याबद्दल आहे.
 
अलीकडेच शैलेश लोढा यांनी आरोप केला होता की, "शो सोडल्यानंतर सहा महिने उलटूनही शोच्या निर्मात्यांनी त्यांचं लाखोंचं थकलेलं पेमेंट केलं नाहीये."
 
यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते सांगतात की, "कोणत्याही कलाकाराचं पेमेंट थांबवलेलं नाहीये. शैलेश लोढा यांचा आरोप चुकीचा आहे."
त्यांनी निवेदनात म्हटलंय की, "देयकाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी वारंवार मेल आणि फोन करूनही शैलेश लोढा सही करण्यासाठी कार्यालयात आले नाहीत. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी किंवा शो सोडता तेव्हा एक अधिकृत प्रक्रिया असते जी पूर्ण करणं आवश्यक असतं. प्रत्येक कलाकार, कर्मचाऱ्याला ही औपचारिकता पूर्ण करावी लागते. त्याशिवाय कोणतीही कंपनी पेमेंट देत नाही."
 
कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न?
 
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसमधील एका जवळच्या सूत्रानं सांगितलं की, "तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळवत आहे. कधीकधी असमाधानी लोक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कंपनीची एक प्रणाली असते. जेव्हा एखादा कर्मचारी किंवा कलाकार पूर्ण आणि अंतिम पेमेंट घेण्यासाठी जातो तेव्हा त्यांनी त्याचं पालन करणं आवश्यक असतं. कंपनीने आजपर्यंत एकाही कलाकाराची पेमेंट थांबवलं नाहीये."
ते पुढे म्हणाले की, "अपूर्ण माहितीच्या आधारे एखाद्या कंपनीची चुकीच्या पद्धतीनं बदनामी करणं अयोग्य आणि अनैतिक आहे. शैलेश लोढा आणि इतर कलाकार हे प्रॉडक्शन हाऊससाठी त्यांच्या कुटुंबासारखे आहेत. संबंधित व्यक्तीच्या आदरापोटी शोमधून बाहेर पडण्याची त्यांची कारणं यावर आम्ही मौन पाळलं आहे. जेव्हा एखादा कलाकार असे वागतो तेव्हा खूप दुःख आणि वेदना होतात. शोमधून मिळालेली लोकप्रियता विसरणं चुकीचं आहे. पेमेंट ही समस्या नाहीये. त्यांना त्यांचं पेमेंट मिळेल. पण त्यांना त्यासाठी क्लोजर करावं लागेल आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल.
 
"तारक मेहता का उल्टा चष्माची जनमानसात प्रतिष्ठा आहे. कंपनीनं पैसे देण्यास एक दिवसही उशीर केलेला नाहीये. असे असते तर एकाही कलाकारानं आमच्यासोबत काम केलं नसतं. तारक मेहता का उल्टा चष्मा हा रोज प्रसिद्ध होणारा शो आहे आणि शोचा दर्जा राखण्यासाठी टीम 24 तास काम करत असते."
 
'रन जेठा रन' गेम झाला लाँच
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा सर्वांत जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. हा शो 2008 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता आणि आता 3600 हून अधिक भागांसह आपल्या 15 व्या वर्षात आहे.
 
या प्रमुख शो व्यतिरिक्त, नीला फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या शोला यूट्यूबवर मराठीत 'गोकुळधामची दुनियादारी' आणि तेलुगूमध्ये 'तारक मामा आयो रामा' नावानं प्रसिद्ध करतात.
सर्व शोचे लेखन आणि निर्मिती असित कुमार मोदी यांनी केली आहे. अलीकडेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने रन जेठा रन हा नवीन गेम लाँच केला आहे. कमी वेळात हा गेम लोकांच्या पसंतीस उतरल्यांच दिसून येत आहे.
 
तारक मेहता का उल्टा चष्माचं बालगीतही यूट्यूबवर सुरू करण्यात आलं आहे. एखाद्या शोची लोकप्रियता इतकी वाढली की त्याच्या नावावर एवढ्या सगळ्या गोष्टी लाँच करण्यात येत असल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Published By- Priya Dixit 
 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

पुढील लेख
Show comments