शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या 5 लोकांशी कधीही उद्धटपणे वागू नये

Chanakya niti आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात अनेक गोष्टी सांगतिल्या आहेत आणि ती आपल्या जीवनात आचरणात आणून आपण एक चांगले आणि सन्माननीय भविष्य जगू शकता आणि इतरांना आदर देऊन आपण देखील सन्मान मिळविण्याचे पात्र बनू शकता. चाणक्य नीती येथे काय सांगते, जाणून घेऊया 5 खास गोष्टी-
 
1. आई : जन्मदात्या आईचा कधीही अनादर करू नये कारण आईचे ऋण कधीच फेडता येत नाही. याचे कारण म्हणजे एक आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवते, सर्व वेदना सहन करते.
 
2. पिता: आचार्य चाणक्य यांच्या मते मुलाच्या जन्मापूर्वीच जे पिता बनतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छांचा त्याग करून त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य तयार करतात. त्यामुळे वडिलांचा कधीही अपमान किंवा तिरस्कार करू नये.
 
3. शिक्षक : चाणक्याच्या मते, जी व्यक्ती किंवा शिक्षक तुम्हाला शिक्षित करून आणि तुमच्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करून समाजात जगण्यास आणि वागण्यास सक्षम बनवत आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे.
 
4. पत्नीचे आई - वडील : सर्व विवाहित पुरुषांनी त्यांच्या पत्नीच्या पालकांचा त्यांच्या स्वतःच्या पालकांइतकाच आदर केला पाहिजे. चाणक्य म्हणतात की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा एखाद्याने आपल्या पत्नीच्या पालकांची सेवा करण्यापासून मागे हटू नये.
 
5. संत-महापुरुष : जर तुम्ही कोणत्याही संत, महापुरुष किंवा गुरूच्या सहवासात असाल तर त्यांचा कधीही अपमान करू नका, कारण ते तुम्हाला धर्माचा मार्ग दाखवून मोक्ष मिळवण्यास मदत करतात.