Dharma Sangrah

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३१

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:14 IST)
 
मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयांत जाऊंन त्यांनी शंकराचें दर्शन घेतलें, तेथें चौरंगीस ठेवून आपण अरण्यांत गेलें. तेथें त्यांनीं एक गुहा पाहिली व दोघेहि तींत शिरले. त्यांनीं चौरंगीस तेथें ठेवून त्याची परिक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथानें एक मोठी शिळा आणिली. अस्त्राच्या योगानें गुहेंत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळांतून तेथें घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशींच एक मोठें झाड होतें, त्याच्या सावलींत तें तिघेहि बसले. तेथें चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथास आज्ञा केली.
 
त्या वेळी गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, चौरंगीनाथचें तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रथानें रुकार दिला व चौरंगीस विचारलें कीं, तूं या ठिकाणीं तप करण्यास बसशील काय ? तेव्हां चौरंगीनें उत्तर दिलें कीं, तुम्हीं सांगाल तें करीन व ठेवील तेथें राहीन , नंतर त्यानें त्या दोघांस विनंती केली की, तुम्ही जेथें असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतकें मला दान दिलें म्हणजे माझें कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथानें कबूल केली.
 
मग त्यांनी त्यास आनंदानें गुहेंत नेऊन ठेविलें व त्यास सांगितलें कीं, तुझी दृष्टि निरंतर या वरच्या दगडाकडे असूं दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणांस पुढें जीं कामें करावयाचीं आहेत तीं जशींच्या तशीं राहून जातील. यास्तव फार सावधागिरीनें राहून आपलें हित साधून घे. इतके सांगुन त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्या वेळीं गोरक्षनाथानें त्यास एक फळ आणुन खावयास दिलें आणि सांगितलें कीं, हीं फळें भक्षून क्षुधा हरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजर वर ठेवुन जिवांचें रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुजकडे लवकरच येऊं असें चौरंगीस सांगुन गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशीं एक शिळा ठेविली. गोरक्षनाथानें चामुंडेंचें स्मरण करतांच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठीं स्मरण केलें म्हणुन तिनें विचारले. तेव्हां तो म्हणाला, येथें एक प्राण आहे त्याच्यासाठीं तुं नित्य फळें आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहात जाईल. परंतु तेथें फळें नेऊन ठेवशील तीं गुप्तपणें ठेवीत जा; त्याच्या समजण्यांत मुळींच येऊं देऊं नको. अशी चामुडेस आज्ञा करून ते गिरिनापर्वतीं आले. त्या आज्ञेप्रमाणें चामुंडा गुप्तपणानें त्यास फळें नेऊन देत असे.
 
शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीति होती व गोरक्षनाथानें शिळेविषयीं फार सावध राहावयास बजावून सांगितलें होतें. म्हणुन एकसारखी तिकडे नजर लाविल्यानें त्याचें फळें खाण्याचें राहून गेलें. तो फक्त वायू भक्षण करून राहूं लागला. नजर चुकूं नये म्हणुन अंगसुद्धां हालवीत नसे. त्याचें लक्ष योगसाधनेकडे लागल्यानें शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीनें चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता.

सर्व पहा

श्री स्वामी शास्त्रिभिः विरचित श्रीत्यागराजाष्टकम्: कल्याण सौगन्धिक पुष्पहार संशोभिकण्ठाय कलाधराय

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

प्रदोषचा उपवास करतांना कोणते नियम पाळावे? उपवास सोडण्याची पद्धत

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments