मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (11:53 IST)

प्रभु श्रीराम यांनी हरणाला का मारले होते? ते शाकाहारी होते की मांसाहारी?

shri ram stuti
Did Lord Shriram eat meat : आत्ताच एन.सीपी(शरद गुट) चे विधायक जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांना मांसाहारी म्हणून संबोधले होते. पण यावर वाद वाढल्या नंतर त्यांनी माफी मागितली होती. आता प्रश्न हा निर्माण होतो की, खरच प्रभु श्रीराम हे मांसाहारी होते की शाकाहारी? त्यांनी हरणाला का मारलेत? तर चला जाणून घेऊ या.  

विरोध कारणाऱ्यांचे मत :
काही लोक हे तर्क लावतात की, प्रभु श्रीराम क्षत्रिय होते त्यामुळे ते मांस सेवन करत होते. यासाठी तर माता सीताने त्यांना हरिण मागितले होते. काही लोक असे तर्क लावतात की, माता सीताने हरणाच्या कातडीची इच्छा व्यक्त केली होती. कारण माता सीता त्या हरणाच्या कातडीपासून आसन किंवा वस्त्र  बनावणार होती. का माता सीताने हरणाच्या कातडीची मागणी केली होती. आणि प्रभु श्रीराम त्या हरणाला मारायला निघून गेलेत. जसे की धर्म हे शिकवीत नाही. जर असे होते तर 
 
प्रभु श्रीराम मांसाहारी होते का? 
प्रभु श्रीराम हे एक संन्यासी आणि वनवासी होते : प्रभु श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांनी आपले राजपाट आणि राजसी वस्त्र त्यागून वनात निघून गेले होते. त्यांनी संन्यासाची वस्त्रे  धारण केली होती. ते सगळे ऋषींच्या आश्रमात राहत होते. तिथे त्यांनी ध्यान आणि तप केलेत. मग ते नंतर दंडकारण्यात राहु लागलेत. व नंतर दंडकारण्यात पंचवटी मध्ये कुटी मध्ये राहु लागलेत. त्यांना कुठल्याच मृगाची गरज नव्हती. कारण ते शुद्ध, सात्विक, तपस्वी जीवन जगत होते. हेच वचन त्यांनी राजा दशरथ यांना दिले होते. 

तुम्ही कधी पाहिले आहे का, कधी की कुटि मध्ये कुठल्या पण पशुची कातडी लावली आहे अस? दूसरे म्हणजे भारतात मैदानी भागात आणि दक्षिण भारतात कधीपण पशुंच्या कातडीपासून वस्त्र बनवण्याचे प्रचलन नव्हते. पशुच्या कातडीपासून वस्त्र हे थंड आणि बर्फाच्छदित प्रदेशात बनवून वापरले जाते. तुम्ही शिवजींचे चित्र  याच वेशभूषेत पाहिले असेल. पण कोणीच वैष्णवी चर्मचे प्रयोग  करत नाही. 
 
 प्रभु श्रीरामांनी हरणाला का मारले? 
* खर तर हे आहे की माता सीताने प्रभु श्रीराम यांना हरीण मारून आणा असे सांगितले नव्हते. तर हरणाला पकडून घेऊन या असे सांगितले होते. 
* कवळ्या हरणाच्या पिल्लाला बघून माता सीता मोहित झाली व जंगलातील एकटेपण दूर करण्यासाठी माता सीताने प्रभु श्रीरामांकडे हरणाच्या पिल्लाला सांभाळन्याची इच्छा व्यक्त केली होती. 
* प्रभु श्रीराम यांनी त्यावेळी माता सीतेला समजवण्याचा प्रयत्न केला की, इवलेसे पिल्लू त्याच्या आई शिवाय राहु शकणार नाही.  तर तू हा हट्ट सोडून दे. 
* मग माता सीता म्हणाली की, ठीक आहे जोपर्यंत त्याची आई येत नाही तोपर्यंत मी या पिल्लाला सांभाळते. 
* यामुळे स्त्री हट्ट पुढे हारुन प्रभु श्रीराम त्या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागे निघून गेलेत. 
* पळतांना ते हरीण दिसायचे,नाही तर एकदम अदृश्य व्हायचे तेव्हा प्रभु श्रीरामांना  समजले की, ते एक मायावी हरीण आहे. 
* हा विचार करून त्यांनी तीर काढला आणि त्या मायावी हरणाचा वध केला.
* कारण प्रभु श्रीराम हे श्री हरी विष्णूंचे अवतार होते. म्हणूनच पहिल्या क्षणी त्यांनी त्या मायावी हरणाच्या रूपात असलेल्या राक्षसाला पाहिले होते. तरी पण त्यांनी सामान्य पुरुषं प्रमाणे, जो पर्यंत त्या हरणाने आपली माया दाखवली नाही तोपर्यंत त्याला  एक छोट हरीण समजून आणि माता सीताची इच्छा म्हणून त्याच्या मागे गेलेत. ते सर्व जाणत होते पण त्यांनी जर असे केले नसते तर पुढची लीला झालीच नसती. प्रभु श्रीराम यांचे आकलन मानवी दृष्टिकोनातून करणे त्रुटिपूर्ण आहे. 
 
प्रभु श्रीराम क्षत्रिय होण्याच्या नात्याने मांस सेवन करीत होते का
१. चला ठीक आहे तुम्ही म्हणतात की, हरणाला यासाठी मारले नव्हते की, त्याच्या कातडीपासून आसन किंवा वस्त्र बनवले जातील 
तर मारले  यासाठी की त्यांना त्याचे सेवन करायचे होते. कारण प्रभु श्रीराम हे क्षत्रिय होते आणि ते मांसाहार सेवन  करीत होते. 
२. याचे उत्तर आहे की, रामायणात कुठेपण प्रभु श्रीराम यांच्या मांसाहार सेवन बद्द्ल लिहिलेले नाही. प्रत्येक ठिकाणी प्रभु श्रीराम, माता सीता, लक्षमण द्वारा कंदमूल खाण्याचा उल्लेख केला आहे. 
३. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांनी वनवासात जातांना आहारविषयी प्रतिज्ञा केली होती की, ते कधीच मांसाहाराचे सेवन करणार नाही. याचा उल्लेख वाल्मीकि रामायण मध्ये आहे.

चतुर्दश हीवर्षाणि वत्स्यामि विजने वने |
मधु मूल फलैः जीवन् हित्वा मुनिवद् आमिषम् ||
 
अर्थात, मी सौम्यवनात मांसाहार त्यागुन एक ऋषींच्या प्रमाणे चौदा वर्ष कंदमूल, फल आणि मधाचे सेवन करेल. 
 
३. वरील श्लोकवरुन हे दिसते की, प्रभु श्रीराम मांस सेवन करायचे पण वनात जाण्यापूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली की, मांसाहाराचे सेवन करणार नाही. पण असे नाहीये की ते मांस सेवन करायचे तरी पण त्यांनी वनात जाण्यापूर्वी प्रतिज्ञा केली होती. 
 
४. आम्ही इथे स्पष्ट करून सांगत आहे की, असे त्यांनी का केले? ते मांसाहार सेवन करायचे नाही तरी पण त्यांनी अशी प्रतिज्ञा का घेतली. कारण त्या काळात युद्धावर जातांना प्रदेश, जंगल तसेच मरुस्थल व कठिन प्रदेशात जातांना लोकांना त्यांच्या  मनासारखे जेवण नेहमी मिळत नसे. पण मांसाहार  सगळ्या ठिकाणी उपलब्ध होते. 

५. दूसरे म्हणजे शत्रुसोबत संधि केल्यावर विपत्ति आल्यावर किंवा विपत्ति काळात मांसाहार करावा लगतो. अशा वेळी  सैनिक व सन्यासी यांना शिकवून ठेवले जाते की, विपत्ति काळात मांसाहाराचे सेवन केलेले चालते. 

६. पण प्रभु श्रीराम यांनी प्रतिज्ञा केली होती की, मी वनवासात जात आहे. पण मी कधीही मांसाहाराचे सेवन करणार नाही. कधीपण आपत्कालीन स्थितीमध्ये व्यक्तीचा धर्म बदलला जातो म्हणून ही प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती.
 
* सुन्दरकांडचा संदर्भ :
सुंदरकांडानुसार, जेव्हा हनुमानजी अशोकवाटिका मध्ये माता सीताला भेटले होते. तेव्हा श्रीराम यांची खुशाली सांगितली. ते कसे आहे, कशाप्रकारे जीवन जगत आहे, त्यांचा दिनक्रम काय आहे या सगळ्याचे वर्णन करत होते. 
 
न मांसं राघवो भुङ्क्ते न चापि मधुसेवते |
वन्यं सुविहितं नित्यं भक्तमश्नाति पञ्चमम् ||
 
अर्थात श्रीराम यांनी कधीच मांसाहाराचे सेवन केले नाही. आणि मदिराचे पण सेवन केले नाही. हे देव फ़क्त प्रत्येक संध्याकाळी त्यांच्यासाठी एकत्रित केलेले कंद ग्रहण करतात. 
 
अयोध्याकांडाचा संदर्भ : या नंतर आयोध्याकांड मध्ये खालील श्लोक निहित आहे. ज्याचे कथन भोजनाची व्यवस्था केल्यानंतर लक्ष्मणने केले होते.  
 
अयम् कृष्णः समाप्अन्गः शृतः कृष्ण मृगो यथा।
देवता देव सम्काश यजस्व कुशलो हि असि ||
 
अर्थात देवोपम तेजस्वी रघुनाथजी, हे काळेसाल असलेले गजकन्द जो बिघडलेल्या सगळ्या अंगाला ठीक करणार आहे. त्याला शिजवलेले आहे. तुम्ही प्रवीणताने देवतांचे यजन करा. कारण त्यात तुम्ही अत्यंत कुशल आहात.