1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
  4. Ambani addresses students at convocation ceremony

एआय वापरा पण त्याचे गुलाम बनू नका - मुकेश अंबानी

Mukesh Ambani's speech on Artificial Intelligence
शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनेल - मुकेश अंबानी
• दीक्षांत समारंभात अंबानी विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील चर्चेत सामील झाले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल ते म्हणाले, “चॅट जीपीटी वापरा, पण लक्षात ठेवा की आपण कृत्रिम बुद्धिमत्तेने नव्हे तर आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने पुढे जाऊ आणि तुम्ही पुढे जाऊ शकता.” ते पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या (पीडीईयू) दीक्षांत समारंभात बोलत होते. विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
 
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मी आपल्या तरुण विद्यार्थ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक साधन म्हणून करण्यात पारंगत झाले पाहिजे परंतु स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर कधीही थांबवू नका. हे विद्यापीठ सोडताच, तुम्हाला आणखी मोठ्या विद्यापीठात, 'युनिवर्सिटी ऑफ लाईफ' मध्ये प्रवेश घ्यावा लागेल. जिथे कॅम्पस नसेल, वर्गखोल्या नसतील आणि शिकवण्यासाठी शिक्षकही नसतील. तुम्ही स्वतःच्या बळावर आयुष्यात पुढे जाऊ शकाल."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले, “पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाचा जन्म हा पंतप्रधानांच्या असाधारण दूरदृष्टीचा परिणाम आहे. वीस वर्षांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते की गुजरातने ऊर्जा आणि ऊर्जा उत्पादनांमध्ये देशाचे नेतृत्व करावे अशी त्यांची इच्छा आहे. जागतिक दर्जाचे मानवी संसाधने विकसित करण्यात गुजरातनेही आघाडीची भूमिका बजावली पाहिजे. आणि अशाप्रकारे, हे आघाडीचे विद्यापीठ स्थापन झाले. ” मुकेश अंबानी हे पीडीईयू( PDEU)चे संस्थापक अध्यक्ष आणि सभापती.आहेत.
 
दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी यांनी दावा केला की, “मला स्पष्टपणे दिसत आहे की या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनेल. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या विकासाच्या प्रवासाला रोखू शकत नाही.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
महाकुंभातील संगम येथे चेंगराचेंगरी