गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (13:33 IST)

तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचे निधन

आपल्या वेद पुराणांत बैलाला धर्माचे अवतार मानतात. होय, आणि वेदांमध्ये बैलाला गायीपेक्षाही अधिक मौल्यवान म्हटले आहे. दरम्यान, जर आपण नंदी बैलाबद्दल बोललो तर तो भगवान शिवाच्या मुख्य सदस्यांपैकी एक आहे. सध्या जे प्रकरण समोर आले आहे ते मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील आहे. येथे बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेले जटाशंकर धाम आहे आणि येथे एक नंदी बैल मरण पावला, ज्यावर नंतर हिंदू विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दफन करण्यात आले.विशेष म्हणजे या नंदीला  तीन शिंगे आणि तीन डोळे होते. 
 
तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यामुळे शेवटच्या दिवशी मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलावर अंतिम संस्कार करण्याचा आणि ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षांपासून तो नंदी ज्या जागेवर येऊन बसायचा . त्याच ठिकाणी या नंदीचा मृत्यू झाला. यामुळे मंदिर समितीने  त्याच ठिकाणी खड्डा खणून त्याची समाधी बनवली. हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता हेही सर्वांना सांगावे. त्यादरम्यान तीन डोळे आणि तीन शिंगे असलेल्या या बैलाला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आणि त्यामुळेच जटाशंकर धाममध्ये हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
 
जेव्हापासून हा बैल इथे आला, तेव्हापासून जटाशंकर धामला येणारे सर्व भाविक लोकांनी त्याचे नाव नंदी ठेवले. भाविक मंदिरात आल्यावर या नंदीबैला जवळ जाऊन थांबून नवस मागायचे. आता नंदीच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी नंदीला समाधी देण्यात आली आहे, ती जागा समिती स्मारक म्हणून विकसित करणार आहे. जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तालुक्या पासून 15 किमी अंतरावर आहे.
 
येथे चारही बाजूंनी सुंदर पर्वतांनी वेढलेले एक शिवमंदिर आहे आणि येथे विराजमान असलेल्या भगवान शिवाला नेहमी गायमुखातून पडणाऱ्या प्रवाहाने अभिषेक केला जातो. या मंदिरावर तीन लहान पाण्याचे कुंड आहेत, ज्यांचे पाणी कधीच संपत नाही. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कुंडांतील पाण्याचे तापमान नेहमीच हवामानाच्या विरुद्ध असते. असे मानले जाते की येथील पाण्यात आंघोळ केल्याने अनेक रोग दूर होतात

Edited By- Priya Dixit