संबंधित माहिती
- दोन दानवेत फरक काय तर एक देव आणि दुसरे दानव - ईश्वर बाळबुधे
- काय खरंच मोदींनी 15 लाख महिना पगारावर मेकअप आर्टिस्ट ठेवला?
- आम्ही राहुल गांधी आहोत का? - संबित पात्रा
- मुकेश अंबानी म्हणाले- मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास झाला
- 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या सेकंद इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 2 लाखांहून अधिक लोक भाग घेतील
राज्यांचा मूड बदलतोय, कॉंग्रेस हवी भाजपा नको, मात्र पंतप्रधान पदी मोदीच
निवडणुका येत असून अनके सर्वे सुरु आहेत. तर राजस्थानमध्ये येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार काम सुरु केले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा सरकारला जोरदार फटका बसणार आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल असे जवळपास स्पष्ट झाले आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदलनार आहेत.विधानसभेसाठी एकूण 200 जागा आहेत. या सर्वेक्षणानुसार, पक्षीय बलाबल पाहिले असता काँग्रेसला 110-120 तर भाजपाला 70-80 जागा मिळतील. सोबतच बीएसपी 1-3, इतर पक्षांना 7-9 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे..राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांच्या कामगिरीवर लोकांनी फार नाराज आहेत. 48 टक्के लोकांनी कामकाज खराब असल्याचे म्हटले आहे. तर 35 टक्के लोकांनी चांगली कामगिरी केल्याचे नोंदविले आहे.त्यामुळे काँग्रेस ला संजीवनी मिळणार असे जरी असले तरी ६० टक्के जनतेला मोदीच पंतप्रधान हवे आहेत.
