मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (00:13 IST)

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वीज बिलाचा धक्का, नवीन सरकारने दरवाढीला मान्यता दिली

bijali
तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी वाईट असू शकते. महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला या महिन्यापासून वीज बिलाचाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रात या महिन्यापासून वीज दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना 1  जूनपासून इंधन समायोजन शुल्क (FAC)आकारण्याची परवानगी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांकडून शुल्क वसूल करण्यात आले नाही. महाराष्ट्रात, 10.5 लाख बेस्ट, 7 लाख टाटा पॉवर, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि 28 दशलक्ष महावितरण ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे.
 
अहवालानुसार, वीज बिलाचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात, ज्यामध्ये निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. आयात कोळसा आणि वायूवर आधारित वीज केंद्र चालवण्याच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात येत आहे. या वाढीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी भारतात विजेची मागणी वाढत असल्याचे म्हटले होते. भविष्यात, विजेची मागणी 205 GW पेक्षा जास्त असू शकते.
 
हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे, कारण वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढलेली असताना हे विधान आले आहे. त्यामुळे वीज संकटाची चिंता वाढली आहे. कोळशाचे साठे संपुष्टात आल्याने आणि अनेक राज्यांनी एसओएस पाठवले आहेत. सरकारने राज्यांना कोळशाची आयात वाढवण्यास सांगितले आणि कोल इंडिया लिमिटेडला राज्य डिस्कॉम्स आणि स्वतंत्र वीज उत्पादकांच्या वतीने निविदा काढण्याचे निर्देश दिले.
 
दरम्यान, महाराष्ट्रातील पोलिसांना वीज बिल फसवणुकीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात फसवणूक करणारे वीज विभागाचे कर्मचारी म्हणून ग्राहकांना मेसेज पाठवतात की थकीत बिलांमुळे वीज कापली जाईल. फसवणूक करणारे ग्राहकांना अॅप डाउनलोड करून पैसे भरण्यास सांगतात.