suvichar

चोखंदळ भूमिकेचा अमित्रियान पाटील

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (11:55 IST)
'सत्या 2’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘मन्या दि वंडरबॉय’ आणि 'बॉईज २' यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनयकौशल्याची छाप पाडणारा देखणा अभिनेता अमित्रियान पाटील 'आसूड' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चोखंदळ दृष्टिकोनामुळे अमित्रियानने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडून गेली आहे. 'प्रमुख किंवा मध्यवर्ती भूमिकेचा अट्टाहास करण्यापेक्षा, भूमिका सहाय्यक जरी असली तरी अल्पावधीत भाव खाऊन जाईल अशी असावी, असे त्याचे मत आहे, आणि त्याने ते वेळोवेळी सिद्ध देखील केले आहे. राम गोपाल वर्माच्या 'सत्या २' सिनेमातील त्याची 'नारा' हि भूमिका असो वा सचिन कुंडलकरांच्या 'राजवाडे अँड सन्स' मधील त्याने साकारलेली एनआरआयची भूमिका असो, अमित्रियानने या दोन्ही सिनेमात स्वतःचे अस्तित्व टिकवले आहे. शिवाय, 'मन्या दि वंडरबॉय' चित्रपटातील त्याच्या 'मन्या' या प्रमुख भूमिकेनेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. इतकेच नव्हे तर, 'बॉईज २' सिनेमात जरी त्याची छोटी भूमिका असली तरी, त्याने या भूमिकेलासुद्धा न्याय मिळवून दिला आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये चित्रपटांचे आकडे वाढविण्यापेक्षा दर्जेदार आणि लक्षात राहतील अश्याच भूमिकेला अधिक प्राधान्य देणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तो एक आहे. असा हा अमित्रियान आता शिवाजी पाटील या एका रांगड्या तरुणाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आला आहे. व्यक्तिरेखेत वैविध्यता जपणाऱ्या अमित्रियानची हि भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडेल, याची खात्री आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

Coconut Island in India भारतातील रहस्यमय 'कोकोनट आयर्लंड' नक्कीच भेट द्या

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

पुढील लेख
Show comments