Festival Posters

मी ट्रोलर्सची पर्वा करत नाही : चेतेश्वर पुजारा

मंगळवार, 17 मार्च 2020 (12:23 IST)
सामन्यादरम्यान सोशल मीडियावर येणेही टाळतो   
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांचे अपयश हे कसोटी मालिकेतल्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे बिनीचे शिलेदार सपशेल अपयशी ठरले. या पराभवानंतर भारतीय फलंदाजांना चाहतंच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुजाराच्या संथ खेळावरही यादरम्यान चांगलीच टीका झाली. पण मी ट्रोलर्सची कधीच पर्वा करत नसल्याचे पुजाराने प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
 
सोशल मीडियावर कौतुक करावे म्हणून मी फलंदाजी करत नाही. अनेकांना माझी शैली समजत नाही, कारण ते मर्यादित षटकांचे क्रिकेट जास्त पाहतात. अरे हा खूप कंटाळवाणे खेळतो, किती चेंडू खेळणार आहे? अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे हे माझे ध्येय नाही. माझ्यासाठी माझा संघ विजयी झाला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. मग मी सौराष्ट्रकडून खेळत असेल किंवा भारताकडून. मी परिस्थितीनुरूप खेळतो. मी शक्य तितके सोशल मीडियावर येणे टाळतो. विशेष करुन फलंदाजी करत असताना मी सोशल मीडियावर येतच नाही. पुजाराने आपली बाजू स्पष्ट केली. न्यूझीलंडमधील अपयशाबद्दल विचारले असता तो म्हणाला, दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान मी ज्या पद्धतीने फटका खेळलो तो चुकीचा होता. मी शक्यतो पूलचे फटके खेळणे टाळतो, मात्र त्या क्षणी तो फटका मी कसा काय खेळलो हेच मला समजले नाही. मला आजही त्याची  सल कायम आहे. 
 
मी मैदानात एकदा स्थिरावलो की माझी विकेट सहजा-सहजी देत नाही. न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर पुजाराने तत्काळ रणजी करंडक स्पर्धेत सहभागी होणे पसंत केले. सौराष्ट्र विरुद्ध बंगाल अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बाजी मारली, पुजारानेही या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा सलग तिसरा पराभव

बिग बॅश लीगचा पहिला सामना भारतात खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी घोषणा केली

अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल

पुढील लेख
Show comments