Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत बनला वन-डे मध्ये नंबर वन

Updated: रविवार, 24 सप्टेंबर 2017 (22:51 IST)
 
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांचा पाठलाग करताना भारतानेही दमदार सलामी दिली. सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी सावध सुरूवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत 22 षटकांत 139 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 62 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी करत 72 धावा, तर अजिंक्‍य रहाणेने 76 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली.
कुल्टर नाइलला उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात रोहीत शर्मा बदली खेळाडू कार्टराइटकडे झेल देऊन बाद झाला, तर कमिन्सने रहाणेला पायचीत बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (28) आणि केदार जाधव (2) झटपट बाद झाले.
 
भारताच्या 35.2 षटकांत 4 बाद 206 असा धावसंख्येनंतर हार्दिक पांड्याने तुफानी फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 45 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्याने मनिष पांडे सोबत पाचव्या विकेटसाठी 78 धावांची निर्णायक भागेदारी केली. हार्दिक पांड्याने 72 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 78 धावांची खेळी करत भारताला विजयासमीप नेले. मनिष पांडे याने नाबाद 36, तर महेंद्रसिंग धोनी 3 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट्रिक कमिन्स याने दोन, तर नॅथन नाईल, रिचर्डसन, ऍगर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हार्दिक पांड्याने 42 धावांवर बाद केले. त्यानंतर ऍरॉन फिंच याने कर्णधार स्टिव्ह स्मिथ सोबत 154 धावांची दमदार भागीदारी केली.
 
सलामीवीर ऍरॉन फिंचने 124 धावांची आक्रमक खेळी केली. फिंचने 125 चेंडूंत 12 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. कुलदीप यादव याने केदार जाधवकरवी त्याला बाद करत ही जोडी फोडली.
फिंचला कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली साथ दिली.
 
स्मिथने 71 चेंडुत 5 चौकारांच्या मदतीने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना स्टिव्ह स्मिथ माघारी परतला. तेव्हा आस्ट्रेलियाची 42 षटकांत 3 बाद 243 अशी भक्कम स्थिती होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला खिळ बसली. पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवाणारे भारतीय गोलंदाज या दोन्ही खेळाडूंपुढे पुरते हतबल दिसले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने आस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तिनशे पार धावसंख्ये नेता आली नाही. भारताकडून जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन, तर चाहल आणि पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री

साईराज बहुतुले यांनी शुभमन गिलच्या दुखापतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली

ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू आयपीएल २०२७ मध्ये सहभागी होणार नाहीत, प्रशिक्षकांनी दिले संकेत

ऋषभ पंतने मुख्यमंत्री धामी यांच्याकडे जमीन मागितली आणि म्हणाला – मी गेल्या ३ वर्षांपासून जमीन शोधत आहे

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे नामिबियामध्ये टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळणार

पुढील लेख
Show comments