तरुणांमध्ये आढळणार्या निद्रानाशाचे बरेच प्रकार आहेत. काही वेळा आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे निद्रानाश होतो. ही समस्या थोड्या काळासाठी उद्भवते. कामातला बदल, परीक्षेचा ताण, आयुष्यातली दुःखद घटना किंवा सततचा प्रवास यामुळेही निद्रानाश होतो. हा त्रास औषधोपचारांशिवायही बरा होतो. काही वेळा रात्री झोपेत अडथळे येतात. गाढ झोपल्यानंतर रात्री अचानक जाग येते. त्यानंतर...