Festival Posters

लग्नाच्या पाच वर्षांनंतर...

गुरूवार, 31 मे 2018 (13:31 IST)
एका वेळेनंतर प्रत्येक नात्यात बदल होत असतात. सगळीच नाती नेहमी एकसारखी राहात नाहीत. काही बदल चांगले वाटतात तर काही बदल हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. नवीन लग्र झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला ळितात.
 
हनीमून 
लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पाहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते.
दुसरं वर्ष
लग्नाच्या दुसर्‍या वर्षात पती-पत्नी एकेमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसर्‍या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो.
बोलणं कमी 
लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदार्‍यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत  नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात.
भांडणं
ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींबद्दल काही काळानंतर चीड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे.
आधीसारखं प्रेम
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहात नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅटिंक डेट्‌स, सरप्राईज देणं, प्रमेच्या गोष्टी, अनेक तास सोबत बसणं हे कमी होतं.
संशयाचं भूत
नात्याचा पाया हा विश्र्वासावर रचला जातो. एकदा विश्र्वास गमवला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्र्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.
नमते घेणे
प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी एक असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे दूर ठेवतील 'हे' 7 सोपे उपाय

कोणत्या हार्मोन्समुळे महिलांचे वजन वाढते? त्याची कारणे, लक्षणे, उपाय जाणून घ्या

मायग्रेन वर नियंत्रण मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

अकबर-बिरबलची कहाणी : गोड शिक्षा

पुरुषांची प्रजनन क्षमता खरोखरच कमी होत आहे का? वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा!

पुढील लेख
Show comments