Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूजा करताना हे जमिनीवर ठेवू नये, नियम माहित नसतील तर वाचा

Updated: शनिवार, 23 जानेवारी 2021 (12:49 IST)
 
देवाची मूर्ती किंवा फोटो
अनेकदा देवघराची सफाई करताना लोक देवाची मूर्ती किंवा फोटो जमिनीवर ठेवतात. पण याने वास्तु दोष निर्माण होतो आणि घरात ताण, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. अशात नेहमी स्वच्छ कपडा किंवा उंच स्थानावर हे ठेवावे.
 
शिवलिंग जमिनीवर ठेवण्याची चूक करु नये
अनेकदा देवघर स्वच्छ करताना लोक शिवलिंग सुद्धा थेट जमिनीवर ठेवून देतात. परंतू याने दारिद्रय येतं. नेहमी शिवलिंगाखाली स्वच्छ कपडा ठेवा आणि स्वच्छ जागेवर शिवलिंग विराजित करा.
 
चुकुनही शंख जमिनीवर ठेवू नये
शंख वाजवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. शंख देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याचे मानले जाते. अशात शंख कधीही जमिनीवर ठेवू नये. शंख वापल्यावर लगचे देवघरात योग्य ठिकाणी ठेवावे.
 
फुलं, तुळस
भगवत गीतेनुसार दीप, धूप, यंत्र, पुष्प, तुळस, कापुर चंदन, जपमाला इतर सर्व वस्तू खूप पवित्र असतात. यांचे पूजेत वापर असल्यामुळे या वस्तू जमिनीवर ठेवणे अशुभ ठरतं. या पवित्र वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नये.
 
पूजा-पाठ सामुग्री जमिनीवर ठेवू नये
पूजा-पाठ संबंधी सर्वच सामुग्री शुभ आणि पवित्र मानली जाते. अशात कलश, पाणी, उदबत्ती, दिवा कोणतीही वस्तू जमिनीवर ठेवणे योग्य नाही. याने वास्तु दोष निर्माण होतो आणि देवी लक्ष्मीची नाराजगी सहन करावी लागते अशात प्रत्येक वस्तू ताम्हण, ताटली, स्वच्छ कापड यावर ठेवून उंच जागेवर ठेवावी.

सर्व पहा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments