Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरात सुख नांदावं म्हणून काही वास्तू टिप्स

Updated: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (16:18 IST)
 
वास्तुशास्त्रानुसार घरातील बांधकामात काही चुका (दोष) असल्यास नकळतपणे त्याचा परिणाम आपल्यावर पडत असतो. या लेखात आपणास काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपल्या घराचे वातावरण आल्हाददायक आणि आनंदी राहणार.
 
1 दारातील बिजागऱ्यांमध्ये तेल टाकावे. दारं उघडताना किंवा लावताना होणार्‍या आवाजामुळे दोष उत्पन्न होतात. 
2 घरातील सर्व विद्युत उपकरण जे जुनाट असतील जसे पंखे आणि कूलर, फ्रीज आवाज करत असतील त्यांना वेळीच दुरुस्त करावे.
3 घरात कमीत कमी वर्षातून एक-दोनवेळा तरी हवन (याग) किंवा यज्ञ करावे. 
4 घरातील इमारतीमध्ये पाण्याचा प्रवाह योग्य नसल्यास किंवा पाणी पुरवठा योग्य दिशेस नसल्याने तर योग्य दिशेस म्हणजे ईशान्य कडील दिशेने भूमिगत पाण्याची टाकी बांधून इमारतीत पाणीपुरवठा करावा. असे केल्यास वस्तू दोष नाहीसा होऊन पाण्याच्या पुरवठा योग्य दिशेस होईल.
5 घरातील देवघर ईशान्य दिशेस करावे.
6 घराचा पुढील भाग उंच असल्यास आणि मागील भागास तळ असल्यास मागील भागास डिश एंटीना लावावे असे केल्यास वस्तू दोष नाहीसा होतो.
7 घराच्या पूर्वी कडे आग्नेय आणि पश्चिमी दिशेस वायव्य असल्यास घराच्या स्वामीस भांडण आणि वाद-विवादामुळे मानसिक ताण होतो.
8 घरातील वायव्य कोण कमी असल्यास शत्रूमुळे मानसिक ताण घराच्या मालकास येतो.
9 घराची दक्षिणेकडे भागास कमी जागा आणि दक्षिणेस जास्त असल्यास कर्जाच्या तसेच आजाराच्या विळख्यात घराच्या स्वामी अडकतो आणि त्यास ताण तणाव होतो.
10 ज्या घराचे नैरृत्य आणि दक्षिणेस भाग खालीस असतो आणि उत्तर आणि ईशान्य दिशेस उंच असल्याने घराच्या स्वामीस मानसिक अशांतीचा त्रास होतो. आपण जर का दुमजली इमारत बांधण्यास इच्छुक आहात आणि तशी योजना आखत आहात तर इमारतीची उंची पूर्वेच्या दिशेने जास्त आणि उत्तरेच्या दिशेने कमी ठेवावे. तसेच इमारतीत ईशान्येच्या दिशेने जास्त प्रमाणात दारं आणि खिडक्या असाव्या.

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments