Dharma Sangrah

घरातून बाहेर करून द्या या 4 गोष्टी, नेहमी राहाल निरोगी

Updated: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:17 IST)
 
* घरात भंगलेली किंवा खंडित मूर्ती नसावी - 
वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असणं वास्तू दोषाला वाढवतं. म्हणून घरातील देवघरात कधीही देवांच्या भंगलेल्या तसविरी आणि मूर्ती असायला नको. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजाराने ग्रस्त होतात. जर आपल्या घरातील देवघरात अश्या काही मूर्ती किंवा तसविरी असतील तर त्यांना विसर्जित करा.
 
* स्वयंपाकघरात असे भांडे नसावे - 
वास्तू विज्ञानानुसार, स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले भांडे किंवा डबे ठेवू नये. स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यात बिगाड होतो. म्हणून हे फार महत्त्वाचे आहे की स्वयंपाकघरातील तुटलेलं आणि फुटलेलं सामान घरातून बाहेर काढावं. या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी किंवा डबे आणावे. पण अश्या तुटलेल्या फाटलेल्या भांड्यांना त्वरित काढून टाका.
 
* घरात तुटलेलं डस्टबिन किंवा कचराकुंडी नसावी- 
वास्तू शास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी. वास्तूचे नियम हे सांगतात की ज्या घरात कचराकुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढतात. म्हणून घरात डस्टबिन किंवा कचराकुंडी तुटलेलीच नसावी, तर स्वच्छ देखील असावी.
 
* जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवू नये - 
बऱ्याचदा असे आढळून येतं की घरात जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवलेले असतात. हे वास्तू दोषाला कारणीभूत असतं आणि या मुळे घरात नकारात्मकता येते ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की घरातून जुने वर्तमान पत्र आणि फाटलेले पुस्तके बाहेर काढून टाका. आपणास इच्छा असल्यास या पुस्तकांना आपण कोणा गरजूंना दान देखील देऊ शकता.

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments