शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (18:11 IST)

रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून का हटवण्यात आले?जाणून घ्या

Election Commission Removed Maharashtra DGP Rashmi Shukla
काँग्रेसच्या तक्रारीवर मोठी कारवाई करत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे डीजीपी रश्मी शुक्ला यांची डीजीपी पदावरून बदली केली. 

 यासह आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना या संवर्गातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नवीन डीजीपीच्या नियुक्तीसाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल 5 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत पाठवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
 
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पटोले यांनी तक्रारीत शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्याचा आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला.

निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगातून रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केली. यासंदर्भात नाना पटोले यांनी 24 सप्टेंबरला पत्रही लिहिले होते. यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावरही कारवाई होणार असल्याची चर्चा होती. मात्र रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ भाजप सरकारने दोन वर्षांनी वाढवला.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आढावा बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या घोषणेदरम्यान निष्पक्ष आणि योग्य वर्तनासाठी अधिकाऱ्यांना ताकीद दिली. ते म्हणाले, कर्तव्य बजावताना त्यांनी वर्तनात नि:पक्षपातीपणे वागले पाहिजे. राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Edited By - Priya Dixit