संबंधित माहिती
- ट्रेलर-स्कॉर्पिओची भीषण टक्कर, चार जणांचा जळून मृत्यू
- जैसलमेरमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात २० जणांचा मृत्यू; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले
- जयपूरच्या एसएमएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, ८ रुग्णांचा मृत्यू
- Cough syrup पिल्याने निरागस मुलांचा मृत्यू
- जयपूर मध्ये चालत्या बसने पेट घेतला, सर्व 30 प्रवासी सुखरूप
जयपूर: मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला वीजेचा धक्का बसून आग लागली; दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
राजस्थानमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला वीजेचा धक्का बसून मोठा अपघात झाला. बसला आग लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आणि अनेक जण भाजले.
मिळालेल्या माहितीनुसार मनोहरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील तोडी गावात, मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आल्यानंतर विजेचा धक्का बसला. दोन कामगार जागीच मृत्युमुखी पडले, तर सुमारे एक डझन जण भाजले. मिळालेल्या वृत्तानुसार, बस उत्तर प्रदेशहून मनोहरपूरच्या तोडी येथील एका वीटभट्टीकडे जात होती. वाटेत, बसचा ११,००० व्होल्टच्या ओव्हरहेड लाईनशी संपर्क आला, ज्यामुळे बसमधून करंट वाहत गेला आणि आग लागली. या घटनेमुळे घबराट आणि गोंधळ निर्माण झाला.
माहिती मिळताच मनोहरपूर पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर भाजलेल्या पाच कामगारांना प्राथमिक उपचारानंतर जयपूर येथे रेफर करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
Edited By- Dhanashri Naik