संबंधित माहिती
- बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट 30 मिनट हॅक राहिले, हॅकरने लावले इमरान खानचे फोटो
- बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार!
- Airtel चा नवीन प्लान, प्रीपेड यूजर्सदेखील घेऊ शकतील लाभ
- वोडाफोनच्या प्रीप्रेड ग्राहकांना घरपोच 4G सिम मिळणार
- BSNL ने या दोन सर्वात लोकप्रिय प्रीपेड योजना बंद केल्या, दररोज मिळत होता 4GB डेटा
अमिताभ यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कर्ज फेडले
बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडले आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, ‘माझं आश्वासन पूर्ण केलं आहे. बिहारमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी होती, त्यांच्यातील २१०० जणांची निवड करण्यात आली आणि ओटीएसच्या (वन टाइम सेटलमेंट) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे’. अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांपैकी काहीजणांना बोलावलं होतं. तिथे मुलगी श्वेता आणि अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रं देण्यात आली.
अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांची मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील तीन हजाराहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं.