अम्माचे निधन २८० नागरिकांनी गमावले प्राण
अम्मा अर्थात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्यानं एकूण 280 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर यामध्ये प्रत्येक मृतांचा नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाखांची मदत एआयडीएमके करणार आहे. जयललिताच्या निधनानं ज्या लोकांनी आपल्या शरीराला इजा करुन घेतली आहे अशा लोकांना 50 हजारांची मदत करण्यात येणार आहे.यामुळे अम्मा यांचा प्रभाव स्पष्टपणे तमिळ जनतेवर कसा होता हे दिसून येतोय. अम्मांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यानं तब्बल 280 जणांनी आपले प्राण गमावल्याची माहित एआयडीएमके पक्षाने दिली आहे.