CBSE चे नवीन भाषा धोरण लागू झाले; जाणून घ्या कोणाला नवीन नियम लागू होणार नाहीत
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केले. मंडळाने स्पष्ट केले आहे की, ही नवीन भाषा प्रणाली सध्या इयत्ता १०वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही.
सीबीएसईने असेही म्हटले आहे की, इयत्ता ७वी, ८वी आणि ९वी मधील विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी मध्ये गेल्यावर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा देण्याची आवश्यकता भासणार नाही.
बोर्डानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच दोन परदेशी भाषा निवडल्या आहे, त्यांना त्याच भाषांच्या संयोजनासह शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, अशा विद्यार्थ्यांना त्यासोबत एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकणे आवश्यक असेल.
अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, त्रिभाषा धोरणांतर्गत दोन परदेशी भाषा निवडलेल्या इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी पर्यंत त्याच भाषा संयोजनासह शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. या नवीन CBSE मार्गदर्शक तत्त्वांमुळे नवीन भाषा धोरणाबाबत लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेला संभ्रम मोठ्या प्रमाणात दूर झाला आहे.
CBSE ने म्हटले आहे की, सुधारित भाषा धोरणांतर्गत, इयत्तेनुसार योग्य अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना विहित कालावधीत उपलब्ध करून दिले जाईल. मंडळाने म्हटले आहे की, नवीन भाषा धोरणाचा उद्देश भाषा शिकण्याची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण, मनोरंजक आणि समृद्ध करणे, त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.
Edited By- Dhanashri Naik