डॉ.चंद्रशेखर यांची खरी ओळख ‘चंद्रशेखर मर्यादा’ अशी केली जाते. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते, असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले होते. त्यांनी सूर्यापेक्षा लहान असलेल्या ताऱ्यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे मांडले होते. त्यांच्या या संशोधनाला सुरुवातीला विरोध झाला.