1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (08:15 IST)

आधुनिक काळातले कौरव हाफपँट घालतात - राहुल गांधी

"21 व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? 21 व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत," असं म्हणत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली आहे.
 
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल बोलत होते. यात्रा सध्या हरियाणात आहे, तिथे राहुल बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
 
"संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत", असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Published By -Smita Joshi