संबंधित माहिती
- Snake in Plane: एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइटच्या कार्गो होल्डमध्ये सापडला साप
- भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडलं, भारतानं म्हटलं तांत्रिक बिघाडामुळे झालं
- पंतप्रधानांकडून शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा
- वागीर : भारतीय नौदलात सामील झालेली ही पाणबुडी शत्रूला असा चकवा देऊ शकते
- आयएनएस 'सायलेंट किलर वागीर भारतीय नौदलात दाखल
मस्कतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान परतले
तिरुवनंतपुरम. तिरुअनंतपुरमहून ओमानमधील मस्कतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कॉम्प्युटर प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर लगेचच सुखरूप परतले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानातील 105 प्रवाशांना दुपारी 1 नंतर दुसर्या विमानाने मस्कतला पाठवण्यात आले.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथून सकाळी 8.30 वाजता उड्डाण घेतलेले फ्लाइट IX 549, सकाळी 9.17 वाजता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. विमानाच्या पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सकाळी विमान तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतल्यानंतर सांगितले की सर्व 105 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
एअरलाइन्सच्या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व प्रवाशांची चांगली काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
पुढील लेख