शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (20:25 IST)

भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडलं, भारतानं म्हटलं तांत्रिक बिघाडामुळे झालं

संरक्षण मंत्रालयाने आज सांगितले की, 9 मार्च 2022 रोजी नियमित देखभाल करताना तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले. सरकारने याची गांभीर्याने दखल घेत उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी या घटनेबद्दल खेदही व्यक्त केला आहे. 
 
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या एका भागात पडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अत्यंत खेदजनक असली तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही देखील दिलासादायक बाब आहे.
 
भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावर अधिकृत उत्तर देताना सांगितले की, देखभालीदरम्यान झालेल्या बिघाडामुळे  हे क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानमध्ये पडले. या घटनेचे आम्हाला दु:ख आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
खुद्द पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा आयएसपीआरच्या डीजींनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, हे क्षेपणास्त्र वॉर हेडशिवाय होते म्हणजेच त्यात बारूद नव्हते आणि सरावासाठी ते डागण्यात आले होते. ते पाकिस्तानच्या मियाँ चन्नू भागात पडले होते. त्यामुळे कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नसून, हे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षेच्या विरोधात असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
 
पाकिस्तानने शुक्रवारी भारताच्या चार्ज डी अफेअर्सना बोलावले आणि या क्षेपणास्त्र ने  आपल्या हवाई क्षेत्राचे कथित उल्लंघन केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आणि या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली ज्यामुळे गंभीर अपघात होऊ शकला असता.