संबंधित माहिती
- सर्वपक्षीय बैठक: सोनिया यांनी केली मोदींवर टीका, विरोधीपक्षांनी मागितलं आश्वासन
- कोरोना औषध : डेक्सामेथासोन किती गुणकारी? भारतात उपलब्ध आहे का?
- चीनची भारताला धमकी
- भारत-चीन संघर्ष : सीमेवर तणाव असतानाच चिनी कंपनी GWM ची पुण्यात मोठी गुंतवणूक
- चीनविरुद्ध भारत सर्जिकल स्ट्राइक करू शकत नाही, वेबदुनियाशी संवाद साधताना माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले, सीमेवर चीनची मनमानी वृत्ती धोकादायक
गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण
गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर अत्यंत तणावाची स्थिती होती. मात्र त्या परिस्थितीतही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सना गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. लष्कराच्या इंजिनिअर्सनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाल करता येणार, हे चीनला ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी या पूल बांधणीला प्रचंड विरोध केला होता. पण भारताने चीनच्या दादागिरीला कुठेही किंमत न देता अत्यंत वेगाने हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल एक प्रकारे चीनच्या दादागिरीला उत्तर आहे.