शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (18:52 IST)

केजरीवाल सरकारच्या घरोघरी शिधा योजनेवर केंद्र सरकारने बंदी घातली

नवी दिल्ली. दिल्लीत मोदी सरकारने घरोघरी शिधा पोचविण्याच्या आप सरकारच्या योजनेला आळा घातला आहे.माध्यमांच्या वृत्तानुसार, ही योजना एका आठवड्यानंतरच राबविली जाणार होती.
दिल्लीत केजरीवाल सरकारने 72 लाख लोकांच्या दारात रेशन पोहोचवण्याची योजना आखली होती. यावर आता बंदी घालण्यात आली आहे.
 
केजरीवाल सरकारने याबाबत सर्व तयारी केली होती. मीडियावृत्तानुसार  केजरीवाल सरकारने ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही. या कारणास्तव रेशनची घरोघरी वितरण करण्याची योजना रोखली आहे.