शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (10:40 IST)

वेळेआधीच केरळमध्ये पोहोचलेला मान्सून आता रखडला, महाराष्ट्रात कधी येणार?

mansoon
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे वाटचाल करत मंगळवारी (7 जून) तामिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मान्सूनची वाटचाल थांबलेली आहे. महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
 
यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच (29 मे) केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर दोनच दिवसांत 31 मे रोजी मान्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली.
 
कारवार, चिकमंगळूरू, बेंगलुरू, धर्मापुरीपर्यंतच्या भागात मान्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मान्सूनने वाटचाल केलेली नाही.
 
वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचं अॅग्रोवनने आपल्या बातमीत म्हटलं आहे.