उड्डाणाच्या अगदी आधी पायलटची प्रकृती बिघडली; वाराणसी-मुंबई विमानाला साडेतीन तासांचा विलंब
वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाचा पायलट उड्डाणाच्या अगदी आधी आजारी पडला. यामुळे साडेतीन तासांचा विलंब झाला.
मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला साडेतीन तासांचा विलंब झाला. पायलटची प्रकृती बिघडल्याचे कळवल्याने एअरलाइनला पर्यायी व्यवस्था करावी लागली. एअरलाइनने सांगितले की, पायलटची प्रकृती अचानक बिघडल्याने अहमदाबादहून बदली पायलटला बोलवावे लागले. यामुळे साडेतीन तासांचा विलंब झाला.या काळात काही प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. मात्र, पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर विमान मुंबईसाठी रवाना झाले.
Edited By- Dhanashri Naik
Edited By- Dhanashri Naik
