1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Violence again in Manipur 13 dead

Manipur: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ,13 जणांचा मृत्यू

13 killed in gunfight
मणिपूर-म्यानमार सीमेवरील तेंगनौपाल जिल्ह्यातील एका गावात 13 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर सोमवारी खळबळ उडाली. मात्र, ठार झालेल्यांकडून कोणत्याही प्रकारची शस्त्रे जप्त करण्यात आलेली नाहीत. वृत्त लिहेपर्यंत कोणाचीही ओळख पटू शकली नाही. पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.
दक्षिणेकडील म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचाराच्या ताज्या घटनेत किमान 13 लोक ठार झाले, परंतु घटनास्थळावरून कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत. 
 
सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सोमवारी दुपारच्या सुमारास तेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळील लेथिथू गावात दोन दहशतवादी गटांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक परिसरात पोहोचले. सैबोल गावाच्या वायव्येस 10 किमी अंतरावर असलेल्या लीथू गावात लष्कराला 13 मृतदेह सापडले, जिथे अलीकडेच आयईडी हल्ल्याद्वारे आसाम रायफल्सच्या गस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
 
पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 3 मे रोजी राज्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर सीमावर्ती भागात खुनाची ही पहिलीच मोठी घटना आहे
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 
पुढील लेख
सुनील कानुगोलू : या व्यक्तीचं ऐकलं असतं तर तेलंगणाप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस सत्तेत असती?