1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (14:02 IST)

नावं बदलल्याने शहरांचा विकास होत नाही- अमोल मिटकरी

भाजपने शहरांच्या नामांतरावरून राज्य सरकारला वेठीस धरू नये. शहरांची नावं बदलल्याने विकास होत नसतो, तर तिथल्या लोकांचा विकास महत्त्वाचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
 
मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उस्मानाबाद-धाराशिव या नामांतराबद्दल भाष्य केलं.
 
"औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्त्वाचा आहे. पण नाव संभाजी महाराजांचं द्यायचं आणि तिथे विकास नसणं, कचऱ्याचे प्रश्न भेडसावत आहेत," असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं आहे. लवकरच शासन त्यावर निर्णय घेईल. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची मागणी होत असली तरी आजही भाजप नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद लिहिलेलं आहे. जे या नामांतराची मागणी करत आहेत, ते राज्य सरकारला वेठीस धरतात. मग गुजरातमधील सर्वांत मोठं शहर असलेल्या अहमदाबादचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलून दाखवावं," असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.