शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (10:09 IST)

बंगाल ते महाराष्ट्र, गंगेत तरंगणारे पापी राजकारण

"गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरू आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेतं जिवंत होतील काय?" असा रोखठोक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्तंभातून केला आहे.
 
"देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजील आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र सेवनामुळे कोरोना झाला नाही असं सांगितलं."
 
"भारतातील गोमूत्र प्राशनावरून रशियासह अनेक देशातील वृत्तपत्रांनी टीका केली आहे. गंगेत जे हजारो मृतदेह सोडून देण्यात आले व ज्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांनी भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आणला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.