1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:04 IST)

पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही - गोपीचंद पडळकर

gopichand padalkar
जातीवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे, अनेक भागांना पाण्यापासून वंचित ठेवणे, मुलभूत सुविधा न देणे. राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री काय केले? देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितले आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झालाय. त्यामुळे पवारांकडे उत्तर नाही. ते यावर बोलू शकत नाहीत. ते निरुत्तर आहेत अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाला हे सांगितले होते. शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.सरकार मजबूत आहे. शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी सांगितले.
 
तसेच विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असंही पडळकरांनी म्हटलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor