संबंधित माहिती
- महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक रुग्णालयात मोफत उपचार करण्याचे आदेश जारी
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- Dahi Handi 2023: राज्य सरकार कडून राज्यातील गोविंदांना विमासंरक्षणची मदत
- तलाठी परीक्षेत गोंधळ ! विद्यार्थ्यांमध्ये संताप….नक्की काय घडले ..??
- राज्य सरकारचा निर्णय, रुग्णांना येत्या15 ऑगस्ट पासून शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार मिळणार
राज्य दुष्काळीवर राज्यसरकारच्या निर्णय, दुष्काळ सदृष परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज
सध्या पावसाने राज्यात पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केल्याची मागणी केली. या वर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या वॉर रूम ला दुष्काळ नियंत्रण वॉर रूम तयार केला जाणार आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सीएम वॉर रूम मधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे. या रूम मधून दुष्काळाच्या हद्दीतील गाव, तालुका जिल्हे, विभागावर दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हे ठिकाण या वॉर रूम शी जोडले जाणार आहे.
दुष्काळग्रस्त भागांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजना सरकार करणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील काही भाग दुष्काळात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्य सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल घेतले आहे. परिस्थितीला बघून त्यावर निर्णय घेतले जाणार.
Edited by - Priya Dixit
