Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्हाला उद्या एक नमुना बघायला मिळेल, ठाकरे परिवाराचा घोटाळा समोर ठेवणार : सोमय्या

Updated: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (17:21 IST)
घोटाळा झाला म्हणून दहा वर्षानंतर आकडा ठेवतात. पोलीस ४२० कलमाखाली एफआयआर दाखल करतात अन् प्रेस नोट काढतात. हा १० वर्षानंतर कुठून घोटाळा आणला असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला. गेल्या तीन महिन्यात ठाकरेंनी १० वेळा नौटंकी केली. जेव्हा जेव्हा ठाकरे सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर कारवाई झाली तेव्हा असे स्टंट झाल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. आयएनएस विक्रांत बचाव निधी घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
ठाकरे सरकारच्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढले तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. किरीट सोमय्यांनी ७५०० कोटी अमित शहांना दिले एकही कागद देण्यात आला नाही. पंतप्रधानांना मोठे पत्र लिहिले की चार ईडी ऑफिसर आणि किरीट सोमय्या घोटाळा करतात. त्यानंतर एसआयटीही नेमली आता दोन महिन्यांनंतरही काहीही झालेले नाही. वसईच्या कंपनीत ४५० कोटी वाधवान यांनी टाकले, पण हेदेखील सिद्ध करता आले नाही. पालघरच्या कंपनीत २६० कोटी ईडीने टाकले. राकेश वाधवान पार्टनर आहे, त्यामध्येही काहीही सिद्ध झाले नाही. जुहू १०० कोटी जमीन घोटाळा, पवईचा ४३५ कोटींचा पीएपी घोटाळा या प्रकारे ठाकरे सरकारने मांडले. हे एक डझन घोटाळ्याचे आरोप करताना दगड मारायचा आणि पुढे जायचे इतक सोप उद्धव ठाकरेंना वाटते का ? आता ५८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप केल्यावर हिशोब द्यावाच लागेल. होम वर्कसाठी नॉट रिचेबल होतो. नॉट रिचेबल काही व्यक्तींसाठी होतो. पण उद्या शुक्रवारी नमुना पहायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो की ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा समोर ठेवणार आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांचा भाजपकडून धमकीचा आरोप, भाजपने आरोप फेटाळले

पालघर सरकारी जमीन एम.एस.आर.डी.सी.कडे सुपूर्द,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

संगमनेर निवडणूक प्रकरणात अमोल खताल यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला

नेपाळमध्ये अशांतता, हिंसाचारात एकाचा मृत्यू, अनेक शहरांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

पुढील लेख
Show comments