1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:53 IST)

'पन्नास खोके, चिडलेत बोके' या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमला

vidhimandal
विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज (25 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी झाली.
 
सकाळी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी पोस्टरबाजी केली तर आता विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.
 
पन्नास खोके चिडलेत बोके, ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा, बलात्काऱ्यांचा सत्कार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून निघाला.
 
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.