संबंधित माहिती
- मग दुष्काळ निवारणाची कामे का होत नाहीत ? राज ठाकरे
- मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश, दुष्काळ पाहणीसाठी सचिवांनो आपल्या जिल्ह्याचा दौरा करा
- नांगरे पाटील यांची नाशिककरांना शिस्त लावणार, विशेष हेल्मेट, सिटबेल्ट बद्दल विशेष मोहीम पूर्ण सात दिवस
- संतापजनक : मानसिक रुग्ण युवतीवर दोघांचा अत्याचार
- पतीला मैत्रिणीसोबत पकडल्यानंतर पत्नी, सासू व सासऱ्याने केली धुलाई
अज्ञात चोरट्यांनी चक्क 300 लिटर पाणी चोरले
मनमाड शहराचा पाणी अत्यंत बिकट असून गेल्या चार दशकांपासून मनमाडकर तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात.
पालिकेकडून महिन्यातुन एकादाच पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करतात. मनमाडच्या श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या विलास आहिरे यांनीही आपल्या घरावर पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या.
त्यापैकी एका टाकीतून अज्ञात चोरट्यांनी चक्क 300 लिटर पाणी चोरून नेले आहे. त्यामुळे आहिरे यांच्या कुटुंबाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. आता पाणी चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहेत.
फोटो: सांकेतिक
