शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (16:53 IST)

26 जानेवारी भाषण Speech on January 26

आदरणीय प्राचार्य जी, माझे सर्व शिक्षक आणि माझे प्रिय वर्गमित्र, सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन.
 
आज आपण भारताच्या गौरवशाली संविधानाबद्दल बोलत आहोत, ज्याचा पाया डॉ. भीमराव आंबेडकर यांनी घातला होता. आज हे संविधान भारताचा आत्मा आहे, किंवा 1950 मध्ये भारतीयांसाठी तयार केलेले नियम, कर्तव्ये आणि अधिकारांचे स्पष्टीकरण आहे, ते देशाच्या पहिल्या व्यक्तीने, म्हणजे राष्ट्रपतीने देखील पाळले आहे, या संविधानाचा आदर करत आहे. हे आम्हा सर्व देशवासीयांचे मूलभूत कर्तव्य आहे.
 
अनेक धर्म, जाती, पंथ, जमाती यांचा समावेश असलेला आणि एकात्मतेच्या धाग्याने बांधलेला आपला देश हा विविधतेने नटलेला देश असूनही आपण दरवर्षी 26 जानेवारी हा भारतीय राष्ट्रीय सण साजरा करतो. आपली राज्यघटना ही देशाची सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे असे म्हटल्यावर आपल्याला अभिमान वाटतो. ज्याची निर्मिती बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण केली. अभिमान वाटतो तेव्हा जेव्हा विविधतेतील एकतेचे राष्ट्रगीत आपल्या कानात गुंजतात आणि अभिमान वाटतो त्या तिरंगा झेंड्याचा जो सदैव आम्हाला भारतीय असण्याची जाणीव करुन देतो.
 
मित्रांनो, 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी आपल्या देशातून भारत सरकार कायदा (अधिनियम) 1935 काढून टाकण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 हा दिवस देशाच्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला. आम्हाला अभिमान आहे की आपण सर्व या प्रजासत्ताक देशाचे रहिवासी आहोत, ज्याला प्रजातंत्र, लोकतंत्र, जनतंत्र किंवा लोकशाही म्हणतात. म्हणजेच भारत देशात सरकारची लगाम केवळ त्याच्यांकडे सोपवली जाते ज्यांना निवडण्याचा पूर्ण हक्क केवळ प्रजेला आहे. संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे जनतेचे कर्तव्य आहे, त्यांनी लोकहिताचे निर्णय घेणारा आणि सध्याच्या काळाला अनुसरून संविधानात आवश्यक दुरुस्त्या करणारा तसेच नेहमी देश सेवेला प्राधान्य देणारा प्रतिनिधी निवडून द्यावा.
 
आपल्या देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन समस्त देशवासियांकडून कोणताही भेदभाव न करता मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, या कार्यक्रमात दरवर्षी प्रमुख पाहुण्यांनाही आमंत्रित केले जाते, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपती, नेते आणि इंडिया गेट, दिल्ली येथे होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशातील सर्व नागरिक सामील होतात, यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सर्व शूर सुपुत्रांच्या बलिदानाचे स्मरण करून अमर जवान ज्योतीला आदरांजली वाहतात. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते आणि समारंभ सुरू होतो, ज्यामध्ये देशाच्या तिन्ही सेना परेडमध्ये भाग घेतात, आणि संपूर्ण उत्साहाने सैन्याच्या शौर्याचे प्रदर्शन करतात, तसेच देशाच्या विविध राज्यांच्या परेडमध्ये झाकी काढली जाते. ज्यामध्ये सर्व राज्यांचे कलाकार आपली कला प्रदर्शित करतात आणि देशाच्या विविध राज्यांची लोकगीते, नृत्य आणि संस्कृती सादर करतात आणि त्यांच्या राज्यांचे सौंदर्य आणि कौशल्य दाखवतात.
 
आज जर आपण अभिमानाने आपल्या देशाला पूर्णपणे स्वतंत्र म्हणू शकतो आणि प्रजासत्ताक दिन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करू शकतो, तर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, लाला लजपत राय यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे आणि आपल्या देशाचे शूर सैनिक आपण सदैव स्मरण केले पाहिजे. कारण त्यांच्या संघर्षामुळे आणि परिश्रमामुळे आज आपण स्वातंत्र्याचे जीवन जगू शकलो आहोत. जर आपण आपल्या शूर सैनिकांप्रमाणेच देशाला समर्पित राहून आणि त्यांच्या वीर गाथेने प्रेरित होऊन देशाची एकता टिकवून ठेवली, देशाप्रती असलेले आपले कर्तव्य समजून घेतले, तरच, दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्याला जोश, उत्साह आणि नावीन्य अनुभवता येईल. शेवटी, हे भाषण ऐकल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि माझे भाषण थांबवताना मला असे म्हणायचे आहे:-
 
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारत मातेचे गुणगान
 
जय हिंद, जय भारत...