शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (12:56 IST)

श्राद्धात कावळा का महत्त्वाचा ?

श्राद्ध पक्षात आपण कावळ्यांनाच अन्न का देतो, त्याला पितर का मानतो? कावळ्यांचे रहस्य जाणून घ्या-
 
कावळा पाहुण्यांचे आगमन आणि पितरांचे आश्रमस्थान मानले जाते.
 
पौराणिक कथेनुसार कावळ्याने अमृत चाखले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू हे एक रहस्य आहे. त्याचा अपघाती मृत्यूच होतो.
 
ज्या दिवशी कावळा मेला, त्या दिवशी त्याच्या साथीदारांपैकी कोणीही अन्न खात नाही.
 
भविष्यात घडणाऱ्या घटनांची कावळ्यांना आधीच कल्पना असते.
 
शास्त्रानुसार कोणताही सक्षम आत्मा कावळ्याच्या शरीरात फिरू शकतो.
 
कावळ्यांना भोजन दिल्याने पितृ आणि कालसर्प दोष दूर होतात आणि त्याच वेळी पितर तृप्त होतात.
 
कावळा न थकता मैल उडू शकतो.
 
एक पांढरा कावळा देखील आहे पण तो फार दुर्मिळ आहे.