Festival Posters

देवशयनी एकादशी व्रत पूजा विधी

शनिवार, 27 जून 2020 (11:01 IST)
आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीलाच देव शयनी एकादशी म्हटलं जातं. या दिवसापासूनच श्रीहरी भगवान विष्णू क्षीर -सागरात झोपतात. कधी कधी या तिथीला 'पद्मनाभा' असे ही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो. 
 
पुराणामध्ये असे ही म्हटलं आहे की भगवान विष्णू या दिवसापासून चार महिन्यापर्यंत (चातुर्मास) पाताळात राजा बळीच्या दारी राहून कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला परत येतात. या मुळे या दिवसाला 'देवशयनी' आणि कार्तिक शुक्लपक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. यंदाच्या वर्षी देवशयनी ही 1 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. आणि 25 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे.
तर जाणून घ्या देवशयनी एकादशी व्रत विधी :
 
* या दिवशी सकाळी लवकर उठावं.
* घराची स्वच्छता आणि दररोजच्या नित्यक्रमातून निवृत्त व्हावे.
* अंघोळ करून घरात पवित्र पाणी शिंपडावं.
* घराच्या देवघरात किंवा कोणत्याही पावित्र्य जागी प्रभू श्रीहरी विष्णूंची सोन्या, तांब्या किंवा पितळ्याची मूर्ती स्थापित करावी.
* त्या मूर्तीची विधी विधानाने षोडशोपचार पूजा करावी.
* त्या नंतर श्री हरी विष्णूंना पितांबर अर्पण करावं.
* या नंतर कथा ऐकावी.
* नंतर आरती करून नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा.
* शेवटी पांढऱ्या चादरीने झाकलेल्या उशी आणि गादीवाल्या पलंगावर श्री विष्णू यांना झोपवावे. 
* माणसाला या चार महिन्यासाठी आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार दैनंदिनच्या व्यवहाराच्या पदार्थांचा त्याग करावं आणि ग्राह्य करावं. 
 
देवशयनी एकादशी व्रताचे फळ :
* ब्रह्मवैवर्त पुराणात देवशयनी एकादशीच्या विशेष महात्म्याचे वर्णन केले आहे. हे व्रत कैवल्य केल्याने प्राण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
* माणसाचे सर्व पाप नाहीसे होतात.
* उपवासधारक चातुर्मासाला विधी विधानाने पाळतील तर त्याचा महाफल प्राप्ती होते.

सर्व पहा

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments