रैभ्याने देवांना गणेशोपासना करण्यास सांगितले. सर्व देवांनी गजमुखाची आराधना सुरू केली. हे पाहून मूषकरूढ गजानन प्रकट झाले आणि त्यांनी लोभासुराला पराजित करण्याचे आश्वासन देवतांना दिले. नंतर गजाननाने शिवाला लोभासुराकडे पाठविले. तेव्हा शिवाने त्याला सांगितले की, 'तू गजमुखाला शरण ये आणि शांततापूर्ण जीवन व्यतीत कर, अन्यथा युद्धासाठी तयार हो. शिवाय गजमुखाचे महात्म्यही सांगितले. गुरू शुक्राचार्यांनीही त्याला गजाननाला शरण जाण्यास सांगितले.
लोभासुराने गणेश म्हणजे काय ते समजून घेतले आणि तो गणेशाला भजू लागला. गजाननाने त्याला आशीर्वाद दिला. देव, ऋषीमुनी आणि ब्राह्मण सर्वजण सुखी झाले. सर्वजण गजाननाचे गुणगाण गाऊ लागले.