Festival Posters

अफगाणिस्तानातल्या या महिलांनी आपले ओठ शिवून का घेतलेत?

Updated: शुक्रवार, 5 जुलै 2019 (10:57 IST)
 
बीबीसीशी बोलताना डीवा नयाजी म्हणाल्या, "ओठ शिवून निदर्शनं करणं ही आमची हतबलता आहे. कारण हे सरकार बहिरं आणि मुकं आहे."
 
या महिला उमेदवार गेल्या तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहेत. या महिलांचा आरोप आहे की, "गेल्यावर्षी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत महिला उमेदवारांबाबत गैरप्रकार झाला आणि आमच्या जागांवरून असे उमेदवार संसदेत निवडून गेले, ज्यांनी लाच आणि दबावाने निवडणुकीचे निकाल बदलले."
 
नयाजी म्हणाल्या, "आम्ही सर्व अफगाणी महिला गेल्या तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहोत. मात्र, आमच्या मागण्या ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रपतींकडे तीन मिनिटांचाही अवधी नाही."
 
आमचं धरणं आंदोलन शेवटच्या श्वासापर्यंत सुरुच राहील, असेही नयाजी यांनी ठणकावून सांगितलं.
 
नजीबा फैज हेलमंदी या नयाजी यांच्यासोबत निदर्शनं करणाऱ्या आणखी एक महिला उमेदवार आहेत. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "महिला उमेदवारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने एक विशेष समिती स्थापन करावी."
 
डॉ. जाहिदा फैजान सांगतात, "आम्ही तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहोत. आम्ही याआधी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र, राष्ट्रपतींचे सल्लागार हमदुल्लाह मुहीब यांनी आमची भेट घेतली आणि आमच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं. मात्र, 25 दिवस उलटल्यानंतर सरकारने आपलं आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
 
डॉ. जाहिदा फैजान यांचाही आंदोलनकर्त्या महिलांमध्ये समावेश आहे.
 
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनासमोर निदर्शनं करणाऱ्या या महिलांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं केली. ईदच्या दिवशी कफन परिधान करून निदर्शनं केली होती. मात्र, तरीही आमचा आवाज कुणीही ऐकला नाही."
 
दुसरीकडे, अफगाणिस्तानातील निवडणूक आयोग आणि सरकारने महिला उमेदवारांचे आरोप फेटाळले आहेत.
 
"अफगाणिस्तानात गेल्यावर्षी झालेली निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष होती. राष्ट्रपती भवनासमोर निदर्शनं करणाऱ्या महिला उमेदवार आपापल्या जागांवर पराभूत झाल्या आहेत", असे निवडणूक आयोग आणि सरकारचं म्हणणं आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments