संबंधित माहिती
- अयोध्येतली जमीन स्वीकारण्याबाबत सुन्नी वक्फ बोर्ड 26 नोव्हेंबरला निर्णय घेणार
- टी 20 मालिका : भारताचा बांगलादेशवर विजय
- महाराष्ट्र सत्तासंघर्ष : भाजप विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार पण आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याची त्यांची तयारी नाही - शिवसेना
- अयोध्या निकाल: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
- अयोध्या प्रकरणाचा संपूर्ण निकाल एका दृष्टिक्षेपात
भारतीय अर्थव्यवस्था आव्हानांना तोंड देतेय - निर्मला सीतारमण
भारत सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, असं भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. व्ही. अनंता नागेश्वरन आणि गुलजार नटराजन यांच्या अर्थविषयक पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात उपस्थितांशी संवाद साधला.
"हे पुस्तक लोकप्रिय होईलच, मात्र धोरणात्मक निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे, पुस्तकाच्या प्रकाशानाची वेळही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देतोय," असं सीतारमण म्हणाल्या.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ गेल्या सहा वर्षातली सर्वांत कमी म्हणून नोंदवली गेलीय. पहिली तिमाहीत ही वाढ 5 टक्क्यांवर आली आहे.