suvichar

मोदींनी केलं नवीन पटनायक यांचं कौतुक

Updated: मंगळवार, 7 मे 2019 (10:12 IST)
 
सोमवारी या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "नवीन पटनायक यांच्या सरकारने किनारी भागातील लोकांना वेळेवर हलवून जीवितहानी टाळली."
 
त्यांनी राज्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आणि केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर बैठकही घेतली. फणी वादळात मृतांचा आकडा 35 वर गेला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत मोदींनी सोमवारी जाहीर केली.
 
दरम्यान, या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण दोनदा फोन केला. मात्र त्यांना फोन घेतला नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
त्यावर बोलताना "मी मोदींना पंतप्रधान मानत नाही. आम्ही स्वतःची मदत करण्यास समर्थ आहोत. मी नवनिर्वाचित पंतप्रधानांशी बोलेन," असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments