Festival Posters

पाकिस्तान की भारत कुणाकडे आहेत जास्त अणुबाँब?

Updated: बुधवार, 26 जून 2019 (11:08 IST)
 
त्यांनी सांगितलं, "2009 या वर्षी भारताकडे 60-70 अणुबाँब होते आणि पाकिस्तानकडे 60 अणुबाँब होते. पण दोन वर्षांत दोन्ही देशांकडे असलेल्या अणुबाँबची संख्या दुप्पट झाली आहे."
 
शेनन काइल सांगतात, "भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अणुबाँब आहेत. विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताकडे 130-140 अणुबाँब आहेत तर पाकिस्तानकडे 150-160 अणुबाँब आहेत."
 
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे त्यामुळे अण्वस्त्रांची संख्या वाढू शकते असा अंदाज आहे. तसं पाहायला गेलं तर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र स्पर्धा नाही. जशी अमेरिका आणि रशियामध्ये पाहायला मिळाली होती.

HTBT कापूस आणि BT वांग्यासाठी शेतकरी आग्रही, मग सरकारची परवानगी का नाही?
 
ते सांगतात की "मी याला स्ट्रॅटेजिक आर्मी काँपिटिशन किंवा रिव्हर्स मोशन न्यूक्लियर आर्मी रेस असं म्हणेल. मला वाटतं नजीकच्या भविष्यात या स्थितीमध्ये काही बदल घडणार नाही."
 
2019 मध्ये कुणाकडे किती आहेत अणुबाँब
रशिया - 6500
अमेरिका - 6185
फ्रान्स - 300
ब्रिटन - 200
चीन - 290
पाकिस्तान - 150-160
भारत - 130-140
इस्रायल - 80-90
उत्तर कोरिया - 20-30
अण्वस्त्रांचा खर्च किती?
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये संरक्षणावर बजेटचा मोठा भाग खर्च केला जातो. पण नेमका कोणता देश अण्वस्त्रांवर किती खर्च करतो हे सांगणं कठीण असल्याचं शेनन सांगतात.
 
दोन्ही देश हाच दावा करतात की आमच्याकडे असलेली अण्वस्त्रं सुरक्षित आहेत. शेनन सांगतात की अण्वस्त्रांची निर्मिती कमी झाली आहे पण त्यांना अद्ययावत करण्याच्या तंत्रज्ञानावर सध्या भर दिला जात आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments