Marathi Biodata Maker

वर्कला अर्थात ’पापनाशम तट’

शनिवार, 28 एप्रिल 2018 (11:16 IST)
वर्कला एक शांत आणि नीरव वस्ती आहे, जी थिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या सीमेलगत स्थित आहे. येथे पर्यटकांच्या आकर्षणाची अनेक स्थळे आहेत-जसे मनोरम समुद्र किनारा, 2000 वर्ष जुने विष्णु मंदीर आणि आश्रम तसेच समुद्रकिनार्यापासून अगदी थोड्या अंतरावर असलेला शिवगिरी मठ.
 
वर्कलाच्या निरभ्र तटावर एक शांत रिसॉर्ट आहे, जेथे नैसर्गिक खनिजयुक्त पाण्याचे झरे आहेत. असे मानले जाते की या किनार्यासवरील पाण्यात अंघोळ केल्यावर शरीर तसेच आत्म्याचीही शुद्धी होते, आणि म्हणूनच याचे नाव ’पापनाशम तट’असे पडले आहे. 
 
येथून थोड्या अंतरावर एका शिखरावर दोनहजार वर्ष जुने असे जनार्दनस्वामी मंदीर आहे. या शिखरावरून आपण समुद्र किनार्यादवरील मनोहर दॄष्यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. जवळच एक प्रसिद्ध शिवगिरी मठ आहे, जो हिंदू समाज सुधारक आणि तत्त्वज्ञ श्री नारायण गुरू (1856 - 1928)यांच्या द्वारा स्थापन केला गेला आहे. या गुरूंच्या समाधीच्या दर्शनासाठी दरवर्षी शिवगिरी तीर्थयात्रेच्या काळात –(30डिसेंबर ते 1जानेवारी) लाखो श्रद्धाळू येथे येतात. नारायण गुरू यांनी जातीपातीमध्ये बाटलेल्या या समाजात “एक जात, एक धर्म आणि एकच ईश्वर “ या मताचे प्रतिपादन केले होते.
 
वर्कला येथे आपल्याला निवासाची उत्तम सोय उपलब्ध होते. याचबरोबर येथे असलेल्या अनेक आयुर्वेदिक मसाज केंद्रांमुळे हे ठिकाण एक लोकप्रिय आरोग्य केंद्र म्हणून मोठ्या वेगाने प्रसिद्ध होत आहे..
 
आकर्षणे: समुद्र किनारे, नैसर्गिक शुद्ध पाण्याचे झरे, शिवगिरी मठ आणि 2000-वर्ष जुने विष्णूचे प्राचीन मंदीर.
 
स्थान: थिरुवनंतपुरम शहरापासून उत्तरेस 51 किमी आणि थिरुवनंतपुरम जिल्यातीलच कोल्लम पासून दक्षिणेस 37 किमी दूर.
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळील रेल्वे स्थानक: वर्कला-साधारण 3 किमी दूर
जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 57 किमी दूर.
 
साभार : केरळ पर्यटन

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

''सिंधुदुर्ग'' महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

पुढील लेख
Show comments