राजेश खन्नाचे पांच सर्वश्रेष्ठ चित्रपट
राजेश खन्नाने कित्येक चित्रपटात कसदार अभिनय केला आहे. संवादफेक, लकबी आणि अभिनयाने त्यांनी लाखोंच्या हृदयात घर केले. म्हणून सर्वश्रेष्ठ पांच चित्रपट निवडणे महत्कठिण आहे.
आनंद (१९७१)
''
बाबू मोशाय, हम सब रंगमंच की कठपुतलियां है जिसकी डोर उपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा कोई नयी जानता''. आनंद चित्रपटाने जिंदादिलीची नवीन व्याख्या लिहिली. राजेश खन्न विषयी बोलणे आनंद शिवाय अपूर्ण आहे. ते किती कसदार अभिनेते होते, हे सांगण्यासाठी आनंद हा एकच चित्रपट पुरेसा आहे.ऋषिकेश मुखर्जींच्या या क्लासिक चित्रपटात त्यांनी रंगवलेली कँसरग्रस्त तरूणाची भूमिका भावी पिढीतल्या कलाकारांसाठी उदहारण बनली आहे. या चित्रपटात आजाराच्या शेवटच्या स्टेज मध्ये असलेल्या आनंद सहगलची भेट भास्कर बॅनजीँ (अमिताभ बच्चन) सोबत होते. आनंदला भेटल्यानंतर भास्करला जीवनाचे नवीन दर्शन घडते आणि आनंदच्या मृत्यनंतर शेवटी तो उद्गारतो की, 'आनंद मरा नही, आनंद मरते नही'. जिंदगी कैसी है पहेली हाय... गाण्यातून प्रेक्षकांना त्याच्या अंतकरणातील दुखाचे दर्शन घडते. पुढच्याच क्षणास तो एका अनोळखी व्यक्तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, ''कैसे हो मुरारी लाल, पहचाना की नही''. आनंदच्या पात्रातील विविधांगी पदर राजेश खन्ना जसा जगला त्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. आनंद ने शिकवले की मृत्यू तर येणारच, मात्र आपण जगणे सोडू शकत नाही. आयुष्य लांब नाही मोठे असायला पाहिजे. आयुष्यात जीतके दिवस जगाल, आनंदाने जगा. हा आनंद आज आपल्यात नाही मात्र त्याने रंगवलेले पात्र अमर्त्य राहिल.
आराधना (१९६९)